रशियाचा मित्र कोण, चीन, भारत की बेलारुस? रशियात झाला सर्वे; भारताला ‘इतक्या’ लोकांचा पाठिंबा

रशियाचा मित्र कोण, चीन, भारत की बेलारुस? रशियात झाला सर्वे; भारताला ‘इतक्या’ लोकांचा पाठिंबा

India Russia Relation : रशिया हा भारताचा विश्वासू सहकारी आणि मित्र (India Russia Relation) आहे. जागतिक राजकारणात याची प्रचिती रशियाने (Russia) अनेकदा दिली आहे. पाकिस्तान तणावाच्या काळातही (India Pakistan Tension) रशियाने भारतालाच साथ दिली. रशियाच्या एस 400 प्रणालीने पाकिस्तानचा प्रत्येक हल्ला हाणून पाडला. भारताशी प्रगाढ होत असलेल्या या सबंधांवर आता रशियाच्या जनतेनंही शिक्कामोर्तब केलं आहे. रशियन सरकारच्या मालकीच्या एका सर्वे एजन्सीने नुकताच एक सर्वे केला होता. यातून रशियाचे लोक चीन, बेलारुस आणि भारताला सर्वात चांगले मित्र राष्ट्र समजत असल्याचे समोर आले आहे.

या सर्वेत चीन 65 टक्के समर्थनासह अव्वल आहे. 41 टक्क्यांसह बेलारुस दुसरा तर 26 टक्के समर्थनासह भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे भारताच्या रँकिंगमध्ये वाढ झाली आहे. आधी भारच पाचव्या क्रमांकावर (Russian People) होता तो आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

भारताची रँकिंग का वाढली

भारताच्या रँकिंगमध्ये वाढ का झाली आहे या प्रश्नाचं उत्तर देताना सेंट पीटर्सबर्ग स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक स्टॅनिस्लाव तकाचेंको यांनी सांगितले की याचं कारण सातत्य आहे. युद्धाच्या सुरुवातीपासूनच (Russia Ukraine War) रशियावर लादलेले प्रतिबंध भारताने मान्य केलेले नाहीत. पश्चिमी देशांनी रशियावर सैन्य आणि आर्थिक दबाव टाकण्यास सुरुवात केली त्याचवेळी दोन्ही देशांतील व्यापारात वाढ झाली. तुमचा खरा मित्र अनेक मुद्द्यांवर तुमच्याशी सहमत किंवा असहमत असू शकेल. परंतु एक मित्र नक्कीच तुमच्या बाजूने असला पाहिजे. त्याने तुमची मदत केली पाहिजे किंवा काही प्रकरण तटस्थ तरी राहिले पाहिजे असे त्यांनी सांगितले.

‘व्हाट द हेल’; युक्रेनवर रशियाचा पुन्हा एकदा सर्वात मोठा हवाई हल्ला; ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया

भारत रशियाची मैत्री किती जुनी

भारत आणि रशिया (India Russia Friendship) यांच्यात राजनयिक संबंधांची सुरुवात 1947 पासून झाली. त्यावेळी भारत आर्थिक आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. त्यामुळे तत्कालीन सोव्हिएत संघ देशाला मदत देण्यात महत्वाचा भागीदार होता. यामध्ये खनन, ऊर्जा आणि इस्पात उत्पादन गुंतवणूक हे घटक होते.

काळानुसार दोन्ही देशांतील मैत्री अधिक घट्ट होत गेली. शीतयुद्धाच्या काळात सोव्हिएत युनियनने भारताचे समर्थन केले होते. सन 1971 मध्ये भारत पाकिस्तान यांच्या युद्धाच्या प्रसंगात अमेरिका आणि चीनने पाकिस्तानला मदत केली. याच वर्षात भारत आणि रशियाने मित्रता आणि सहकार्य करारावर सह्या केल्या होत्या. पण याआधीही सोव्हिएत युनियनने भारताचे समर्थन केले होते.

सन 1965 मध्ये भारत पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले होते. या युद्धात यूएसएसआरने मध्यस्थी केली होती. 1966 मध्ये ताश्कंद शिखर संमेलनाचे यजमानपद स्वीकारली. त्यावेळी एक शांतता करार झाला होता. सोव्हिएत युनियनने भारताच्या समर्थनात अनेकदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या वीटोचा वापर केला होता. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भारत रशिया संबंधांना मागील काही वर्षांपासून जागतिक राजकारण एक स्थिर संबंध असल्याचे सांगितले होते.

बांग्लादेशात पिक्चर हळूहळू बदलतोय.. युनूस यांची सत्ता धोक्यात; डिसेंबरपर्यंत अल्टीमेटम!

follow us
  • fb
  • instagram
  • youtube